रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई-हक्क PUBLIC DATA ENTRY (PDE)

 

Session wise Lesson Plan

विषय

ई-हक्क

 PUBLIC DATA ENTRY (PDE)

 

ई-हक्क ओळख आणि महत्व

१. जमाबंदी आयुक्त कार्यालयाच्या वतीने व जिल्हाधिकारी पुणे यांच्या मदतीने ई हक्क ( PDE – Public Data Entry ) नावाने एक नवीन ऑनलाईन आज्ञावली विकसित करणेत आलेली आहे.

२. कोणत्याही खातेदाराला / संबंधित व्यक्तीला तलाठी कार्यालयाकडे वेगवेगळ्या हक्काच्या नोंदी ७/१२ वर फेरफार च्या स्वरुपात घेण्यासाठी जे अर्ज करावे लागतात ते अर्ज ऑनलाईन पद्धतीने तलाठी कार्यालयात न जाता घरीबसून देखील दाखल करता येतील.

३. या मध्ये  सध्या पहिल्या टप्प्यात  १. इकरार २. बोजा चढविणे/गहाणखत ३. बोजा कमी करणे ४. वारस नोंद ५. मयताचे नाव कमी करणे ६. अ.पा.क. शेरा कमी करणे ७. ए.कु.में.नोंद कमी करणे ८. विश्वस्थांचे नाव बदलणे ९. संगणीकृत ७/१२ मधील चूक दुरुस्ती करण्यासाठी अर्ज  असे नऊ प्रकारचे फेरफार घेण्यासाठीचे अर्ज संबंधित खातेदार अथवा संबंधित व्यक्तीला ई हक्क प्रणालीतून ऑनलाईन पद्धतीने दाखल करता येतील

४. फेरफार प्रकारासाठी कोणती कागदपत्रे जोडावी लागतील त्यांची यादी देणेत आली असून अशी कागदपत्रे स्कॅन करून (स्वयं साक्षांकित प्रत) पीडीएफ स्वरुपात अपलोड करता येतील .

५. अशा पद्धतीने दाखल केलेल्या प्रत्येक अर्जाला अर्ज नंबर (application ID) मिळेल व त्याची ऑनलाईन पोहोच देखील अर्जदाराला मिळेल व अश्या अर्जांची स्थिती अर्जदाराला प्रत्येक टप्प्यावर तपासता येईल व प्रत्येक टप्प्यावर मोबाईलवर मेसेज येईल.

६. असा भरलेला अर्ज तलाठ्याकडे ऑनलाईन जाईल तो योग्य असल्याची खात्री करून तलाठी तो अर्ज स्वीकारील अथवा कारण देयून पुन्हा अर्जदाराकडे दुरुस्ती साठी पाठवेल किंवा पूर्णतः कारण नमूद करून नाकारील . यासाठी  प्रत्येकं अर्जदाराने या प्रणालीवर मोबाईल नंबर देवून  नोंदणी करणे आवश्यक आहे.

७. ई हक्क ही प्रणाली ई-फेरफार प्रणालीला पूरक असून त्यामधून केलेलं सर्व अर्ज तलाठी यांना ई फेरफार मध्ये प्राप्त करून फेरफार मध्ये रुपांतरीत करता येणार आहेत त्यासाठी ही प्रणाली ई फेरफार प्रणालीशी संलग्न करणेत आलेली आहे .

८. याच प्रणालीमध्ये माहिती भरून तलाठी देखील फेरफार घेणार आहेत त्यामुळे ऑनलाईन अर्ज आल्यास तलाठ्याला पुन्हा डेटा एन्ट्री करावी लागणार नाही पर्यायाने तलाठी यांना देखील ही प्रणाली सहाय्यभूत ठरणार आहे .

९. वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांना देखील अशा सर्व अर्जांचा आढावा घेण्यासाठी MIS  उपलब्ध करून दिले जाणार आहेत त्यामुळे महसूल प्रशासनामध्ये पारदर्शकता व गतिमानता येण्यास आणखी मदत होईल.

ई-हक्क - PUBLIC DATA ENTRY (PDE) चा प्रवाह

याचे दोन भाग आहेत:

अ) नागरिक/खातेदार(वापरकर्ता) यांच्याकडून फेरफारासंबंधी डेटा एन्ट्री, ई हक्क सर्व्हर मध्ये कागदपत्रे जोडणे आणि तद्नंतर सदर डेटा ई-फेरफार डेटाबेस ला वेबसर्व्हिस  द्वारे पाठविला जाणे.

ब) तलाठी यांच्या लोगिन ला सदर डेटा उपलब्ध होणे आणि तलाठी यांनी सदर फेरफार अर्ज पुढे  फेरफार घेण्याकरिता स्वीकारायचा (accept) किंवा नाकारायचा (reject) हे ठरविणे.

 

 Website-

 


https://pdeigr.maharashtra.gov.in/Helpfile.aspx
  सदर वेबसाईट चा वापर ई-हक्क PUBLIC DATA ENTRY करण्याकरिता करावा.

 

Main part of this lesson

कार्यपद्धती

. सर्वप्रथम ई-हक्क या प्रणालीत अर्ज दाखल करण्यासाठी https://pdeigr.maharashtra.gov.in/Helpfile.aspx या वेबसाईट वर लोगिन करावे.

२. सदर प्रणालीमध्ये खातेदार/नागरिक,बँक प्रतिनिधी,सोसायटीचे सचिव आणि तलाठी अर्ज दाखल करू शकणार आहेत.याकरिता या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल व त्यासाठी आपले पूर्ण नाव,पत्ता, मोबाइल नंबर, ई मेल आयडी, PAN कार्ड नंबर इत्यादी माहिती द्यावी लागेल व आपला युजर आय डी व पासवर्ड एकदा तयार करावा लागेल.तयार केलेला युजर आयडी व पासवर्ड जतन करून ठेवावा लागेल व तो  प्रत्येकवेळी लॉगीन करण्यासाठी वापरावा लागेल.

३. खातेदार/नागरिकांसाठी  खातेदारांनी सदर वेबसाईट मध्ये लोगिन करून create new user account   मध्ये जावून नवीन युजर आयडी  पासवर्ड तयार करावा

तलाठी यांच्या साठी  तलाठी यांचा इफेरफार चा सेवार्थ आयडी आणि पासवर्ड हाच त्यांचा युजर आयडी  पासवर्ड असेल.

४. सदर प्रणालीमध्ये लोगिन केल्यानंतर ७/१२ Mutations हा पर्याय निवडावा.

५. तद्नंतर जिल्हा,तालुका आणि गाव निवडा करावे. खातेदार/नागरिक,बँक   प्रतिनिधी,सोसायटीचे सचिव याकरिता राज्यातील सर्व जिल्हे,तालुके आणि गावे उपलब्ध असतील परंतु तलाठी यांच्याकरिता त्यांच्या DSC ला निवडण्यात आलेली गावेच फक्त उपलब्ध असतील .

६. गाव निवडा केल्यानंतर फेरफार घेण्याकरिता अर्ज करण्यासाठी पुढील नऊ प्रकारचे फेरफार उपलब्ध असतील

१. वारस नोंद
२. बोजा / गहाणखत  दाखल करणे
३. बोजा कमी करणे
४. ई करार नोंदी
५. मयताचे नाव कमी करणे
६. अज्ञानपालनकर्ता चे नाव ( अपाक ) कमी करणे
७. एकत्र कुटुंब पुढारी / म्यानेजर ( एकुम्या ) कमी करणे
८. विश्वास्थांचे नाव बदलणे
९. संगणीकृत ७/१२ मधील चूक दुरुस्ती करण्यासाठी अर्ज

७. ज्या फेरफारा करिता अर्ज दाखल करावयाचा आहे तो फेरफार प्रकार निवडल्यानंतर त्या फेरफार  प्रकारासंबंधी माहिती आणि आवश्यक कागदपत्रे ई.माहिती देणारी हेल्प फाईल (तक्ता) समोर येईल.

८. त्यानंतर मुख्य अर्ज भरताना अर्जदाराची माहिती,खातेदाराची माहिती आणि कागदपत्रे जोडा या टप्प्यामध्ये अर्ज भरायचा आहे.

९. अर्जदाराची माहिती यामध्ये अर्जदाराचे नाव टोपण नावासहित  (मराठी आणि इंग्रजी मध्ये), इमेल आयडी, मोबाईल नंबर आणि अर्जाचा दिनांक याबाबत माहिती भरावयाची आहे.अर्जदाराची माहिती भरताना आपल्याला एकाच इंग्रजी कि-बोर्डच्या सहाय्याने इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेत माहिती भरता येईल. देवनागरी मधे माहिती भरावयाची असेल तर नावाचे इंग्रजी स्पेलींग टाईप करावे आणि नंतर स्पेस बार द्यावा टाईप केलेला इंग्रजी शब्द मराठीत दिसेल. ई-हक्क प्रणालीत  दाखल केलेल्या प्रत्येक अर्जाला अर्ज नंबर ( application ID) मिळेल व त्याची ऑनलाईन पोहोच देखील अर्जदाराला मिळेल व अश्या अर्जांची स्थिती अर्जदाराला प्रत्येक टप्प्यावर तपासता येईल व प्रत्येक टप्प्यावर मोबाईलवर मेसेज येईल त्याकरिता  प्रत्येकं अर्जदाराने या प्रणालीवर मोबाईल नंबर देवून  नोंदणी करणे आवश्यक आहे.

१०. खातेदाराची माहिती यामध्ये खातेदाराचे पहिले नाव आणि खाता क्रमांक यानुसार खातेदाराची माहिती शोधून निवडता येणार आहे.त्यानंतर निवडलेल्या खातेदाराचे त्या खात्याशी संबंधित सर्व गट/सर्वे नंबर निवडण्यासाठी उपलब्ध होतील .निवडलेल्या गटांचे क्षेत्र आपोआप दिसणार आहे.त्यानंतर फेरफार प्रकारनिहाय उर्वरित माहिती भरणे आवश्यक आहे.

११. कागदपत्रे जोडा यामध्ये फेरफार प्रकारासाठी हेल्प फाईल मध्ये देण्यात आलेली कागदपत्रे स्कॅन करून (स्वयंसाक्षांकित प्रत ) पीडीएफ स्वरुपात अपलोड करता येतील . सदर फाईल ची मर्यादा 300 KB पर्यंत देण्यात आलेली आहे.कागदपत्रे अपलोड केल्यानंतर आपण निवडलेली सर्व कागदपत्रे आपल्या अर्जाला जोडली जातील.

१२. तद्नंतर अर्जात दिलेली माहिती योग्य व अचूक असल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र सहमत आहे आणि सहमत नाही या पद्धतीने सादर करावयाचे आहे.सहमत आहे म्हटल्यास आपला अर्ज पुढे ओटीपी पाठवण्यासाठी जाणार आहे आणि सहमत नाही म्हटल्यास आपण अर्ज करण्याच्या प्रक्रियेतून बाहेर पडणार आहे.

१३. ओटीपी पाठवा निवडल्यानंतर आपण नोंदणी केलेल्या मोबाईल नंबरवर सांकेतांक जाणार आहे.सदर सांकेतांक भरल्यानंतर आपला अर्ज साठवा होईल आणि त्याचा संदेश आपल्या नोंदणीकृत मोबाईलवर येईल.

१४. त्यानंतर अर्जाची प्रत यातून आपणाला आपण सादर केलेला अर्ज पीडीएफ या स्वरूपात पाहत येईल.अर्जाची प्रत पाहण्यासाठी आपल्या browser चे pop up enable (allow) असल्याची खात्री करावी त्याबाबतचा संदेश सदर पेज वर देण्यात आलेला आहे. सदर अर्जाच्या प्रतीबरोबर नमुना ७ मध्ये अर्जाची पोहोच देखील देण्यात आलेली आहे.सदर पोहोच आज्ञावली मधून प्राप्त झाल्याने त्यावर स्वाक्षरीची गरज असणार नाही.

१५. अश्या पद्धतीने घेणेत आलेले प्रत्येक अर्जाचा गोषवारा संबंधित  अर्जदाराला    डॅशबोर्ड मध्ये submitted आणि save as draft मध्ये उपलब्ध होतील. साठवा झालेले अर्ज submitted मध्ये तर काही कारणास्तव साठवा न झालेले अर्ज पुन्हा संपादित करण्यासाठी save as draft  मध्ये उपलब्ध होतील .

१६. ई हक्क ही प्रणाली ई-फेरफार प्रणालीला पूरक असून त्यामधून केलेलं सर्व अर्ज तलाठी यांना ई फेरफार मध्ये फेच करून फेरफार मध्ये रुपांतरीत करता येणार आहेत त्यासाठी ही प्रणाली ई फेरफार प्रणालीशी संलग्न करणेत आलेली आहे . त्यामुळे अर्जदाराने असा भरलेला अर्ज तलाठ्याकडे ऑनलाईन जाईल व PDE DASHBOARD मध्ये पुढील कार्यवाहीसाठी उपलब्ध होतील.तो योग्य असल्याची खात्री करून तलाठी तो अर्ज स्वीकारील अथवा कारण देवून पुन्हा अर्जदाराकडे दुरुस्ती साठी पाठवेल किंवा पूर्णतः कारण नमूद करून नाकारील. अश्या पद्धतीने स्वीकारलेल्या अर्जाचे संबंधित तलाठी ई फेरफार प्रणालीतून फेरफारात रुपांतर करेल आणि त्याची नोंद संबंधित अधिकार अभिलेखात होईल.

 

फेरफार प्रकारनिहाय  माहिती

 

1.इकरार- जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकांकडून शेतकऱ्यांना वितरीत होणारे पीक कर्ज विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमार्फत खातेदाराकडून करून घेतलेल्या कराराप्रमाणे मंजूर केले जाते त्यास इकरार असे म्हणतात.त्याची नोंद गाव नमुना न. ७/१२  च्या  इतर हक्कात घ्यावी लागते.त्यासाठी विविध कार्यकारी सोसायटीतील सचिव यांनी  असा इकरार संबंधित तलाठी यांकडे ई-हक्क प्रणालीतून  दाखल करण्यासाठी https://pdeigr.maharashtra.gov.in/Helpfile.aspx या संकेतस्थळावर नोंदणी करून इकराराच्या छायाप्रतीसह असे अर्ज दाखल करावेत.

सोसायटीची  नोंद करण्याकरीता ऑनलाईन  अर्ज करण्यासाठी खालील माहिती जवळ असणे आवश्यक आहे

. ज्या जमिनीवर नाव लावायचे ते स्थान (जिल्हा,तालुका,गाव,गट/सर्वे नं.)

. अर्जदाराचे संपूर्ण नाव

. अर्जदाराचा मोबाईल नंबर

. अर्जदाराचा-मेल आय डी  (असल्यास)

५. सोसायटी  चढविण्यासाठी सोसायटीचे पत्र

खालील कागदपत्रे जोडणे आवश्य आहे (कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी फक्त ब्लॅक ऍंड व्हाईट पी.डी.एफ फॉर्म मधील )

१.      अर्जदाराचे ओळखपत्र

२.      सोसायटी इकरारची प्रत

2. बोजा चढविणे / गहाणखत - शेतकरी जमिनीवर जे कर्ज घेतात त्याची नोंद गाव न.नं.७/१२ च्या इतर हक्कात घेतली जाते त्याला  बोजाअसे म्हणतात. हि नोंद ज्या फेरफाराने होते त्याला बोजा चढविणेअसे म्हणतात.’बोजा चढविणे साठी ऑनलाईन अर्ज नागरिक स्वतः,तलाठी अथवा ज्या बॅंकेकडून कर्ज घेतले आहे ती बॅंक देखील करु शकते.

बोजा चढविणे / गहाणखताची नोंद करण्याकरीता ऑनलाईन  अर्ज करण्यासाठी खालील माहिती जवळ असणे आवश्यक आहे

. ज्या जमिनीवर नाव लावायचे ते स्थान (जिल्हा,तालुका,गाव,गट/सर्वे नं.)

. अर्जदाराचे संपूर्ण नाव

. अर्जदाराचा मोबाईल नंबर

. अर्जदाराचा-मेल आय डी  (असल्यास)

५. बोजा चढविण्यासाठी बँकेचे पत्र अथवा गहानखताच्या दस्ताची प्रत

 

खालील कागदपत्रे जोडणे आवश्य आहे (कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी फक्त ब्लॅक ऍंड व्हाईट पी.डी.एफ फॉर्म मधील )

३.      अर्जदाराचे ओळखपत्र

४.      बँकेच्या पत्राची प्रत अथवा गहानखताची प्रत

3. बोजा कमी करणे :

शेतकरी जमिन तारण ठेऊन  जे कर्ज घेतात त्याची नोंद ७/१२ वर घेतली जाते  त्याला बोजाअसे म्हणतात. हि नोंद ज्या फेरफाराने होते त्याला बोजा चढविणेअसे म्हणतात . ज्यावेळी शेतकरी कर्ज फेडतात, त्यावेळी ७/१२ वरील बोजाची नोंद कमी होणे आवश्यक असते.  हि नोंद ज्या फेरफाराने होते त्याला बोजा कमी करणेअसे म्हणतात . बोजा कमी करणेकरणे साठी  ऑनलाईन अर्ज  नागरिक स्वतः करु शकतात, ज्या बॅंकेकडून कर्ज घेतले आहे ती बॅंक देखील करु शकते.

बोजा कमी  करण्याकरीता ऑनलाईन  अर्ज करण्यासाठी खालील माहिती जवळ असणे आवश्यक आहे

. ज्या जमिनीवर नाव लावायचे ते स्थान (जिल्हा,तालुका,गाव,गट नंबर/सर्वे नं, कर्जदाराचे नाव )

 . अर्जदाराचे संपूर्ण नाव

. अर्जदाराचा मोबाईल नंबर

. अर्जदाराचा-मेल आय डी  (असल्यास)

   

खालील कागदपत्रे जोडणे आवश्य आहे(कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी फक्त ब्लॅक ऍंड व्हाईट पी.डी.एफ फॉर्म मधील )

१.              अर्जदाराचे ओळखपत्र

२.               बँकेच्या पत्राची प्रत

 

4. वारस :

कोणताही खातेदार विनामृत्युपत्र मयत झाला असल्यास त्याच्या मिळकतीला त्याच्या कायदेशीर वारसांची नावे दाखल केली जातात या प्रक्रियेला वारसनोंद असे म्हणतात . मयत खातेदाराने धारण केलेल्या ( भोगवटदार  अथवा कुळ म्हणून ) जमिनीच्या गाव नमुना नं.७/१२ वर सर्व वारसांची  नावे  दाखल करण्यासाठी वारासापैकी एकाला वारस हा फेरफार प्रकार निवडून वारस नोंदी साठी जमीन ज्या गावात आहे त्या तलाठ्याकडे ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल.   

वारसांची नोंद करण्याकरीता करावयाच्या ऑनलाईन अर्जासाठी  खालील माहिती जवळ असणे आवश्यक आहे

१. ज्या जमिनीवर नाव लावायचे ते स्थान (जिल्हा,तालुका,गाव,गट नंबर/ सर्वे नं , मृत व्यक्तिचे नाव)

२. वारसांची  संपूर्ण नावे

३. वारसांच्या  जन्म तारखा

४. वारसांचे मोबाईल नंबर

५. वारसांचे आधार नंबर

६. वारसांचे इ-मेल  आय.डी. (असल्यास)

खालील कागदपत्रे जोडणे आवश्य आहे (कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी फक्त ब्लॅक ऍंड व्हाईट पी.डी.एफ फॉर्म मधील)

१. अर्जदाराचे ओळखपत्र

. मयत व्यक्तीच्या मृत्यू प्रमाणपत्र ( जून २०१५  तारखेनंतर मृत्यू झाला असेल तर प्रमाणपत्राचा क्रमांक)

. वारसाचे मृत व्यक्तीशी असलेल्या नाते दाखवणारे दस्त (उदा : जन्म प्रमाणपत्र,शाळा सोडल्याचा दाखला ,  शालांत परीक्षेचे प्रमाणपत्र , रेशन कार्ड , मतदार ओळखपत्र , राष्ट्रीयकृत बँक पासबुक,   ...)

5. मयताचे नाव कमी करणे :

एखाद्या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर नावे असलेल्या व्यक्तींपैकी एखाद्या व्यक्तीचा मॄत्यू झाल्यास  व त्या मयत व्यक्तीला असलेले सर्व वारसांची नावे  यापूर्वीच ७/१२ वर दाखल असल्यास  फक्त त्याचे नाव ७/१२ उताऱ्यावरुन काढून टाकणे आवश्यक असते. त्यामुळे फक्त मयत व्यक्तीचे नाव कमी करण्याकरीता या फेरफार प्रकारचा चा उपयोग करावा.

                  

मयताचे नाव कमी करणे ची फेरफार  नोंद करण्याकरीता करावयाच्या ऑनलाईन  अर्जा साठी खालील माहिती जवळ असणे आवश्यक आहे

 . ज्या जमिनीवरील नाव कमी करायचे त्या जमिनीचे स्थान (जिल्हा,तालुका,गाव,गट नंबर/ सर्वे नं , मृत व्यक्तिचे नाव)

 . संपूर्ण नाव ( मयत व्यक्तीचे )

 ३. मयत व्यक्तीचा आधार क्रमांक

 . अर्जदाराचे नाव व मोबाईल नंबर

 . -मेल  आय डी (असल्यास)

खालील कागदपत्रे जोडणे आवश्य आहे (कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी फक्त ब्लॅक ऍंड व्हाईट पी.डी.एफ फॉर्म मधील)

 . अर्जदाराचे ओळखपत्र

 .मृत्यूचा दाखला

३.       स्वयंघोषणा  संमती पत्र ( या मध्ये सर्व वारसांची माहिती असावी )

 

6..पा..शेरा कमी करणे :

 एखाद्या जमीनीवर नावे असलेल्या व्यक्तींपैकी कोणी व्यक्ती कायद्याने अज्ञान (१८ वर्षांपेक्षा लहान) असेल तर तिच्या सोबत अज्ञान पालक कर्ता म्हणून सज्ञान व्यक्तीचे नाव ७/१२ उताऱ्यावर लावण्यात येते.  अज्ञान व्यक्तीचे वय १८ पूर्ण झाल्यानंतर अज्ञान पालक कर्ता व्यक्तिचे नाव ७/१२ वरुन कमी करण्यात येते. याला अ.पा.क. शेरा कमी करणे असे म्हणतात .

.पा..शेरा कमी करणे  करण्याकरीता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी   खालील माहिती जवळ असणे आवश्यक आहे.

. ज्या जमीनीवरील अ.पा..शेरा कमी करायचा त्या जमिनीचे  स्थान (जिल्हा,तालुका,गाव,गट नंबर/सर्वे नं.  अज्ञान व्यक्तिचे नाव)

. अर्जदाराचे संपूर्ण नाव

. अर्जदाराचा मोबाईल नंबर

. अर्जदाराचा-मेल आय डी  (असल्यास)

. अज्ञान खातेदाराची जंन्मतारीख

खालील कागदपत्रे जोडणे आवश्य आहे (कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी फक्त ब्लॅक ऍंड व्हाईट पी.डी.एफ फॉर्म मधील )

१.       अर्जदाराचे ओळखपत्र

२.       वयाचा पुरावा

7.. कु.मॅ. नोंद कमी करणे :

एखाद्या जमिनीवर एखाद्या व्यक्तिची एकत्र कुटुंब मॅनेजर अशी नोंद झालेली असेल आणि ती नोंद कमी करून सर्व वारसांची नोंद ७/१२ वर घेण्यासाठी  या पर्यायाची निवड करावी

. कु.मॅ. नोंद कमी करणे नोंद करण्याकरीता खालील माहिती जवळ असणे आवश्यक आहे

. ज्या जमिनीवर नोंद कमी करायची ते स्थान ( जिल्हा, तालुका, गाव, गट नंबर/ सर्वे नं. )

. . कु.मॅ. नोंद दाखल झालेल्या मूळ / जुन्या फेरफार ची नक्कल

. अर्जदाराचे नाव व  मोबाईल नंबर 

. अर्जदाराचा-मेल आय.डी.  (असल्यास)

खालील कागदपत्रे जोडणे आवश्य आहे (कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी फक्त ब्लॅक ऍंड व्हाईट पी.डी.एफ फॉर्म मधील)

. अर्जदाराचे ओळखपत्र

.. कु.मॅ. ची नोंद दाखल झालेल्या मूळ फेरफाराची नक्कल

. मूळ फेरफारातील सहधारकाचे / वारसाचे स्वयंघोषणा संमती  पत्र

8. विश्वस्तांचे नावे बदलणे:

 ज्या धर्मादाय / सामाजिक / सहकारी संस्था  यांच्या विश्वस्तांची नावे  दाखल असतात त्या बाबतीत विश्वस्तांचे नावे बदलणे नोंद करण्याकरीता खालील माहिती जवळ असणे आवश्यक आहे.

. ज्या जमिनीवर विश्वस्तांचे नावे बदलावायचे आहे त्या जमिनीचे  स्थान (जिल्हा,तालुका,गाव,गट नंबर/सर्वे नं. )

. अर्जदाराचे संपूर्ण नाव

. अर्जदाराचा मोबाईल नंबर

. अर्जदाराचा-मेल  आय डी (असल्यास)

. विश्वस्तांचे नाव बदलणे बाबत चा आदेशाची प्रत

       खालील कागदपत्रे जोडणे आवश्य आहे (कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी फक्त ब्लॅक ऍंड व्हाईट पी.डी.एफ फॉर्म मधील )

. अर्जदाराचे ओळखपत्र

२.धर्मदाय आयुक्त यांचं आदेश प्रत

 

9.संगणीकृत ७/१२ मधील चूक दुरुस्ती करण्यासाठी अर्ज :  

संगणीकृत ७/१२ मधील चूक दुरुस्ती नोंद करण्याकरीता खालील माहिती जवळ असणे आवश्यक आहे

१.अर्जदाराचे ओळखपत्र

२.जुना हस्तलिखित ७/१२ प्रत

३.जुना हस्तलिखित फेरफार

४.इतर

प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी

  सदर  प्रणाली ची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी  पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात करण्यात आली आहे आणि तदनंतर  GSDC CLOUD वर स्थानांतरीत केलेला पहिला जिल्हा वाशीम येथे  टेस्टिंग पूर्ण झाले असून सध्या ई-हक्क प्रणाली पूर्ण राज्यात उपलब्ध करून दिली आहे .

उपलब्धी

१)    १. कोणत्याही खातेदाराला / संबंधित व्यक्तीला तलाठी कार्यालयाकडे वेगवेगळ्या हक्काच्या नोंदी ७/१२ वर फेरफार च्या स्वरुपात घेण्यासाठी जे अर्ज करावे लागतात ते अर्ज  ऑनलाईन पद्धतीने तलाठी कार्यालयात न जाता घरी बसून दाखल करता येतील. 

२)  २. अर्जदाराला आपल्या  अर्जांची स्थिती प्रत्येक टप्प्यावर तपासता येईल .

३)   ३. याच प्रणाली मध्ये माहिती भरून तलाठी देखील फेरफार घेणार आहेत त्यामुळे ऑनलाईन अर्ज आल्यास तलाठ्याला पुन्हा डेटा एन्ट्री करावी लागणार नाही पर्यायाने तलाठी यांना देखील ही प्रणाली सहाय्यभूत ठरणार आहे .

४)   ४.वरिष्ठ महसूल अधिकार्यांना देखील अशा सर्व अर्जांचा आढावा घेण्यासाठी MIS करून दिले जाणार आहेत त्यामुळे  महसूल प्रशासनामध्ये पारदर्शकता गतिमानता येण्यास आणखी मदत होईल.

 

Comments

  1. सर एकाच व्यक्तीचे सातबारा वरील नाव व आधार कार्ड किंवा इतर कागदपत्रांवरील नाव वेगवेगळी असल्यास काय कार्यवाही करावी.
    प्रत्येक व्यक्ती राजपत्र घेऊन येत नाही अशावेळी काय कार्यवाही करावी कृपया मार्गदर्शन करावे

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send