रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई पीक पाहणी - शेतकऱ्यांना फायदेशीर - प्रबोधन ५

 शेतकरी मित्रांनो,

ई-पीक पाहणी प्रकल्पामुळे  शेतकऱ्यांना  होणारे फायदे 

‘ई-पीक पाहणी’ या मोबाईल ॲपमुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात लागवड केलेल्या पीक पेरणीची अचूक नोंद होणार आहे. ‘ई-पीक पाहणी’ महाराष्ट्र शासनाचा प्रकल्प शेतकऱ्यांच्या दृष्टीने अति महत्वाचा, व फायद्याचा आहें.

या ॲपवरील नोंदीमुळे महाराष्ट्र राज्यात, एखाद्या पिकाचा ऐकून पीक पेरा किती झाला आहे याची अचूक आकडेवारी एका क्लिकवर शासनाकडे उपलब्ध होणार आहे.

नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या अचूक पीकपेरा आकडेवारीच्या आधारावर उत्पादनाबद्दल अंदाज बांधता येने सुद्धा शक्य होणार आहे. यावरुन भविष्यात लागणाऱ्या बी-बियाणे, खत शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देता येणार आहे. 

संपूर्ण महाराष्ट्रातील शेतावरील गटावर झालेल्या पीक पेरणीच्या नोंदीचा फायदा हा किती क्षेत्रावर महाराष्ट्रात किती ऊत्पन्न झाले हे सांगण्यासाठी होणार आहे.

पिकाची नोंद करताना घेतल्या जाणाऱ्या पिकाच्या छायाचित्रामुळे किती अक्षांश आणि रेखांश वर कोणत्या प्रकारच्या पिकाचा पेरा झाला आहे हे समजण्यास मदत होईल. 

एका मोबाईलहून 20 शेतकऱ्यांच्या नोंदी करता येणार आहेत. प्रत्येक शेतकऱ्याकडे मोबाईल नसतो ह्या बाबीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने अशा प्रकारची सोय या ॲप मध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने करण्यात आली आहे.

आपला,

रामदास जगताप

उप जिल्हाधिकारी व राज्य समन्वयक ई पीक पाहणी प्रकल्प, पुणे.

Comments

Archive

Contact Form

Send