रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

४८ लक्ष खातेदारांनी केली ई पीक पाहणी

 ई पीक पाहणीला  शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद - ४८ लक्ष खातेदारांनी केली ई पीक पाहणी  
महसूल मंत्री  श्री बाळासाहेब थोरात 


मुंबई, दि. 9


: महसूल  विभागाच्या वतीने  शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सुरु करण्यात आलेला ई-पीक पाहणी हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून राज्यात आज अखेर सुमारे ४८ लक्ष खातेदार शेत्कायांनी ई पीक पाहणी मोबाईल ॲप चा वापर केला आहे . या प्रकल्पामुळे शेतकरी अधिक सक्षम होण्यास मदत होणार असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.


                       श्री. थोरात म्हणाले की, शेतकऱ्यांच्या सातबारावर पीक पाहणीची अचूक नोंद होण्यासाठी  राज्य शासनाने ' माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीक पेरा' ही मोहीम हाती घेतली आहे. ई-पीक पाहणी मोबाईल ॲप प्रकल्पास राज्यभरातील शेतकरी वर्गातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजपर्यंत वीस  लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी हे ॲप डाऊनलोड केले असून या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी देखील नोंदविली आहे. महाराष्ट्रात राबविण्यात येणारा हा व्यापक प्रकल्प असून हा प्रकल्प राज्यातील प्रत्येक कुटुंबाशी जोडला जाणारा आहे. या प्रकल्पामुळे शेतकरी बांधवांना आपल्या पीकाची माहिती स्वत:च भरणे शक्य होणार आहे या मध्ये पिकाची माहिती , जल सिंचनाची साधने विहिरी, बोअरवेल, गोडावून, जनावरांचे गोठे, कांदा चाळी, ठिबक सिंचन, शेततळे यांच्या देखील अचूक  नोंदी करता येणार आहेत . आताच्या डिजिटल युगात शेतकऱ्यांना सहज, पारदर्शक व बिनचूक पध्दतीने आपल्या शेतातील ही माहिती शासनाकडे ऑनलाईन पाठविता  येणार आहे.


                                  जमीन महसूल कायद्यानुसार शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची पध्दत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे शेतातील पिकांची अचूक माहिती शासनाकडे उपलब्ध होते , अतिवृष्टी किंवा दुष्काळ यामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. शिवाय या पीक नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांना  पीक कर्ज , पीक विमा  मिळणे देखील सुलभ होणार आहे  तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात मोठा बदल केला जात आहे. ई- पीक पाहणी प्रकल्पामुळे गाव, तालुका आणि जिल्हानिहाय प्रत्येक पिकाचे क्षेत्र शासनाला  समजण्यास मदत होणार असल्याने शेतीचे अधिक  चांगले नियोजन करणे शासनाला शक्य होणार असल्याचे  महसूलमंत्री म्हणाले.


राज्यातील नाशिक विभागातील शेतकऱ्यांचा सर्वाधिक प्रतिसाद ई - पीक पाहणी ला दिला असून अमरावती विभागात देखील चांगले काम झाले असून सर्वात कमी प्रतिसाद कोकण विभागात मिळत आहे 

रामदास जगताप 

उप जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक ई फेरफार प्रकल्प पुणे  

Comments

Archive

Contact Form

Send