महाराष्ट्रातील ई फेरफार प्रणाली ची वैशिष्ट्ये .
नमस्कार मित्रांनो ,
विषय - महाराष्ट्रातील ई फेरफार प्रणाली ची वैशिष्ट्ये .
राज्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी यांचे सह सर्वच महसूल अधिकारी ७/१२ संगणकीकरणाचे हे काम अनेक वर्षे करत आहे तरीही ते पूर्णत्वास जात नाही असे आपल्या पैकी अनेक महसूल अधिकारी , कर्मचारी व जनतेला वाटते मात्र वस्तुस्थिती काय आहे हे आपल्याला समजावे / ज्ञात व्हावे म्हणून थोडीशी माहिती सांगतो .
राज्यातील ई फेरफार प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सन २०१२-१३ पासून खऱ्या अर्थाने सुरु केले . आज आपला हा प्रकल्प काय स्थरावर आहे व त्याची काय वैशिष्ट्ये आहेत ? त्याची थोडी माहिती घेवू या .
ई फेरफार प्रकल्पाची वैशिष्ट्ये
१. राज्यात ई फेरफार प्रकल्प( ऑनलाईन ७/१२ ) व आय सरिता ( दस्त नोंदणीचे काम ) प्रकल्प एकमेकाना पुराक असून ते एकमेकांना जोडलेले आहेत . आज रोजी जमीन मिळकतीचे हस्तांतर अथवा गहाणखत तसेच बक्षीस पत्र व वाटणी पत्राची दस्त नोंदणी दुय्यम निबंधक यांचे कार्यालयात ऑनलाईन केल्यास ( स्किप पर्याय न वापरता ) ७/१२ नाव असलेल्याच व्यक्तीला जमीन दस्त करून देता येतो व त्याची नावे संगणीकृत ७/१२ वरून जशीच्या तशी घेवून दस्त नोंदणी केली जाते . ७/१२ वर नाव नसलेल्या व्यक्तीला जमिनी चा दस्त करून देता येत नाही .२. ऑनलाईन दस्त नोंदणी करणेत येणारी जमीन भूधारणा वर्ग २ , सरकार व सरकारी पट्टेदार या प्रकारातील असेल तर सक्षम अधिकाऱ्याची पर्वान्गीए घेतलेले आदेश तहसीलदार यांना दाखवून सदरचे ७/१२ दस्त नोंदणीसाठी प्रतिबंधन मुक्त ( unblock) करून घ्यावा लागतो त्यामुळे सरकारी नियंत्रण असलेल्या जमिनीचे हस्तांतार्णामुळे शर्तभंग होण्याचा प्रश्न उद्भवत नाही .
३. ऑनलाईन दस्त नोंदणी करताना दस्त करून देणार व घेणार यांचे पूर्ण पत्ते व मोबाईल नंबर आय सरिता प्रणाली मध्ये नमूद केल्यास दस्त नोंदणी करताच अश्या दस्ताला ई फेरफार प्रणाली मध्ये देण्यात आलेला फेरफार नंबर पक्षकाराचे मोबाईल नंबर वर मेसेज दिला जातो .
पक्षकार यांना येणारा मेसेज -
आपण् नोंदविलेल्या दस्त क्र. 1242 च्या अनुष्ंगाने फेरफार क्र. 1417 ची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासाठी संबंधित तलाठी किंवा नगर भूमापन कार्यालय यांचे कडे वेगळा अर्ज करण्याची गरज नाही.
सावळदबारा, GAT NUMBER : 120 ; , क्षेत्र 0.0100 (Hectare Aar) संबंधी अभिहस्तांतरणपत्र दु. नि. SYG यांचे कार्यालयात दि. 06/07/2019 रोजी दस्त क्र. 1242 वर नोंदले आहे.
४. ऑनलाईन दस्त नोंदणी केलेल्या जमीन मालकाला त्याची नोंद ७/१२ वर होवून त्याचे नावचे क्षेत्र कमी झाले नसले तरी सदरचे विक्री केलेलं क्षेत्र दुबार विक्री करता येत नाही त्यामुळे फसवणुकीचे प्रकार कमी झाले आहेत.
५. ऑनलाईन दस्त नोंदणी झालेल्या व्यक्तींना फेरफार घेण्यासाठी वेगळा अर्ज पुन्हा तलाठ्याकडे करावा लागत नाही . दस्त नोंदणी पूर्ण होताच दस्त नोंदणी ची सूची २ व स्क्यान दस्ताचे प्रत तलाठी लोगीन ला ई फेरफार प्रणाली मध्ये ऑनलाईन दिसते व तात्काळ फेरफार घेण्याची प्रक्रिया तलाठी स्थरावर सुरु होते .
६. ई फेरफार प्रणाली मध्ये तलाठी स्थरावर सुरु केलेल्या फेरफाराची मंजुरी पर्यंत ची स्थिती तलाठी चावडी च्या डिजिटल नोटीस बोर्डावर म्हणजेच आपली चावडी ( https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/aaplichawdi या साकेत स्थळावर जगात कोठून देखील कोणालाही पाहते येते .
७. ई फेरफार प्रणाली मध्ये मंडळ अधिकार्याने मंजूर केलेल्या फेरफाराचा ७/१२ वर तात्काळ अंमल होवून अद्यावत विनास्वाक्षारीत ७/१२ त्याच क्षणाला महाभूमी च्या संकेस्थळावर ( https://bhulekh.mahabhumi.gov.in/ ) कोनालाही कोठूनही पहाता येतो .
८.ई फेरफार प्रणालीमध्ये तलाठी स्थरावर डिजिटल अस्वक्षारीत झालेले ७/१२ तात्काळ खातेदाराला जगभरातून कोठून देखील महाभूमी प्रकल्प संस्थेच्या संकेत स्थळावर ( https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/Satbara) उपलब्ध करून देनेत आला आहे .
९. ई फेरफार प्रणालीचे कामकाज ग्राम स्थारा वरून चालत असून खातेदारांना त्यासाठी तालुक्याला जाण्याची गरज नाही .
१० . ई फेरफार प्रणालीतील ९० % पेक्षा जास्त ७/१२ सध्या असून त्यासाठी तलाठी व मंडळ अधिकारी यांनी गेल्या २ / ३ वर्षा पासून अहोरात्र कामकाज केले असून उर्वरित ७/१२ देखील अचूक करण्यासाठी महारष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम १५५ अंतर्गत दुरुस्ती प्रक्रिया करणेचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे .
११. आज अखेर ई फेरफार प्रणालीत ७० लक्ष फेरफार नोंदी घेण्यात आल्या असून २५० लक्ष ७/१२ संगणकीकृत केले आहेत . तसेच १०८ लक्ष ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत झाले असून गेल्या साडेतीन महिन्यात ११० लक्ष ७/१२ व खाते उताऱ्यांचे वितरण तलाठी यांचे स्थरावर करणेत आले आहे .
१२ . ई फेरफार प्रणालीचे सर्व कामकाज क्लाऊड वर स्थलांतरित केले असून सध्या तांत्रिक व सर्वर च्या अडचणी कमी झाल्या आहेत .
१३. आपला संगणकीकृत ७/१२ अचूक असल्याची खात्री प्रत्येक खातेदाराने करावी व चूक दुरुस्ती साठी आपले गावचे तलाठी अथवा तालुक्याचे तहसीदार यांचेशी संपर्क करावा .
टीप :- वरील प्रमाणे कार्यवाही सुरु असून त्यात व्यक्ती परत्वे अथवा स्थान परत्व्ये कमी जास्त त्रुटी अथवा अडचणी असू शकतात .
तरीही ई फेरफार च्या या यशस्वीतेसाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाला मनापासून धन्यवाद .
आपला
रामदास जगताप
उप जिल्हाधिकारी व राज्य समन्वयकई फेरफार प्रकल्प ( महारष्ट्र राज्य ) , पुणे
दिनांक १३.७.२०१९
Comments