डिजिटल स्वाक्षरीत सातबारा - जबाबदारी ची जाणीव
नमस्कार मित्रांनो ,
आपण सध्या अहोरात्र DSP काम करत आहात , त्याबाबत काही महत्वाच्या सूचना द्यावयाच्या आहेत .
१) घोषणापत्र ३ करताना आपण आपल्या गावाची दिनक १६.१०.२०१७ रोजी च्या परिपत्रकाप्रमाणे परिपूर्ण संचिका तालुका अभिलेख कक्षात जमा केली असेन .
२) अशी संचिका प्रत्यक्ष सर्व प्रमाणपत्र , प्रपत्र व दुरुस्त केलेले ७/१२ . ८ अ सह असल्याची खात्री तहसीलदार यांनी करावी . तहसीलदार यांनी सर्व गावांची अशी संचिक जमा झाल्याची खात्री करूनच प्रख्यापानाचा आदेश काढणे आपेक्षित आहे .
३) प्रख्यापण आदेशानंतर तलाठी यांनी DSP चे काम सुरु करण्यापूर्वी सर्व ODC अहवाल निरंक केले असल्याची खात्री करावी .
४) कदाचित काही अहवाल घोषणापत्र ३ करताना आपण निरंक केले असतील तरीही आत्ता दिसत असलेले सर्व अहवाल निरंक करणे आवश्यक आहे .
५) ODC मध्ये काही नवीन हवाल जसे कि अतिरिक्त अहवाल ११ , अतिरिक्त अहवाल ५ हे अहवाल व ते निरंक करण्यासठी च्या सुविधा काहीश्या उशिरा मिळाल्या असल्यातरी ते सर्व अहवाल DSP चे काम सुरु करण्यापूर्वी करणे आवश्यक आहे .
६) डिजिटल स्वाक्षरीत केला जाणारा प्रत्येक ७/१२ आपण स्वतः ( तलाठी ) योग्य असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक ७/१२ कन्फर्म करण्यापूर्वी स्वयघोषणा तलाठ्याने करणे आवश्यक आहे .
७) DSP करण्यासाठी आता ७/१२ PDF करण्याची गरज नाही अशी सुधारणा काही दिवसापूर्वी केली असल्याने आता ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत करताना दोनच टप्पे आहेत.
८) एकाही अचूक नसलेला ७/१२ तलाठी यांनी डिजिटल स्वाक्षरीत करू नये कारण त्याची उपलब्धता ONLINE पद्धतीने होणार असलेले तो कोणत्याही शासकीय व कायदेशीर कामांना वापरला जाऊ शकतो.
९) ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत करण्यापूर्वी सर्व शेती चे ७/१२ मध्ये मागील तीन वर्षाची पिक पाहणी केलेली असावी. बिनशेती क्षेत्र असलेल्या ७/१२ वर पिक पाहणी भरणे आवश्यक नाही.
१०) अहवाल १ निरंक करण्यासाठी तहसीलदार यांचे कडून कलम १५५ चे अथवा उप विभागीय अधिकारी यांचे करून कलम २५७ प्रमाणे आदेश प्राप्त करून घेऊनच दुरुस्त्या करणेत याव्यात.
११) अहवाल ३ निरंक करताना आपल्या गावचा मुळ आकारबंद पाहूनच गाव नमुना नं. १ मधील सर्वे निहाय क्षेत्र हे. आर मध्ये नमूद करावे. अकृषक अथवा कृषक ७/१२ सुद्धा अहवाल ३ आपण क्षेत्र आर चो मी मध्ये रुपांतरीत करूनच दाखवला आहे. बिगरशेती प्लॉट पडले असले तरी त्याचे आकारबंद मधील खेत्र हे आर मधेच नमूद करावे .
१२) अहवाल ३ निरंक करण्यासाठी आकारबंदातील क्षेत्र चुकीचे भरून अहवाल निरंक करू नये . प्रत्यक्ष आकारबंद पाहूनच क्षेत्र भरावे
१३) ई फेरफार मध्ये दिलेला खातेदारांच्या संखेच्या अहवाल प्रमाणे खाते विभागणी आवश्यक असल्यास ODC मधील दुरुस्ती सुविधा खाते क्रमंक बदलने मधून करावी .
१४) ज्या तालुक्यांचे अद्याप घोषणापत्र ३ चे काम पूर्ण झाले नाही त्यांनी ODC निरंक करूनच अंतिम प्रमाणपत्र द्यावे .
१५) आगोदर आपण फक्त ONE TIME DSP करत होतो , आत्ता गाव नमुना न. ७ मध्ये कोणताही बदल फेरफार मंजुरीनेच होणार व आस फेरफार मंजूर झाले नंतर ज्या ७/१२ वर त्याचा परिणाम होणार आहे ते सर्व ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत करण्यासाठी DSP मध्ये फेरफार पश्च्यात डिजिटल स्वाक्षरी साठी ( DSP AFTER MUTATION ) उपलब्ध होणार व तो सातबारा DSP केलेला जुन्या ७/१२ च्या जागी रिप्लेस होणार असी सुविध निर्माण करून काही जिल्ह्यांना उपलब्ध करून दिली आहे लवकरच सर्व जिल्ह्यांना ती मिळेल .
१६) ज्या ठिकाणी क १५५ / क २५७ प्रमाणे आदेश आवश्यक तेथे आदेश प्राप्त करून घेऊनच दुरुस्त्या कराव्यात . आपल्या फेरफारामध्ये नमूद क १५५ / क २५७ च्या आदेश्याचा उल्लेख आहे त्याची नक्कल आपल्याला देता आली पाहिजे हे लक्षात ठेवा .
त्यासठी या प्रकल्प मध्ये काम करत असलेल्या प्रत्येकाची म्हणजेच तलाठी मंडळ अधिकारी , नायब तहसीलदार , महसूल पालक अधिकारी , तहसीलदार , उप विभागीय अधिकारी , डी डी ई , जिल्हाधिकारी यांची जबाबदारी आहे ह्याची जाणीव नेहमी मनात ठेवावी.डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ च्या कामात १०० % गुणवत्ता राखणे आपले सर्वांचे काम व जबाबदारी आहे .
या प्रकल्पातील प्रमुख अडथला म्हणजे योग्य क्षमतेचे सर्वर , या साठी शासनाने नुकतीच दि. १९ मे,२०१८ रोजी CLOUD POLICY आणली असल्याने आत्ता आपला प्रकल्प देखील CLOUD वरच जाणार हे निश्चित आहे .
आपण हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी केलेल्या कष्टाचे फळ - अचूक डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ देखील माझ्याच सहीने तयार व्हावा अशी भावना अनेक तलाठी यांनी माझेकडे बोलून दाखवली त्या सर्वांचे व आपल्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन .
आपला
रामदास जगताप
दिनांक २७.५.२०१८
Comments