रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

कोल्हापूर - कोंकण विभाग दौरा कार्यक्रम -

नमस्कार मित्रांनो

कोल्हापूर - कोंकण विभाग दौरा कार्यक्रम -

दि ५.११.२०१९

       आपल्या ई फेरफार प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कोल्हापूर - कोंकण विभाग दौरा करण्याचे निश्चित करून दि ५ नोव्हेंबर२०१९ रोजी सकाळी ६.३० वा कोल्हापूरला रवाना झालो . कोल्हापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर या मुळे व त्या नंतर च्या विधानसभा निवडणुकीमुळे ई फेरफार अंमलबजाणी मध्ये आलेली मरगळ दूर करण्यासाठी तालुका स्थरीय मास्टर ट्रेनर्स साठी कार्यशाळा व मार्गदर्शन ठेवावे असा मनोदय होता मात्र . जिल्हाधिकारी व डी डी ई हे दोघेही महत्वाच्या बैठकीसाठी पुण्याला जाणार असलेने त्याचे नियोजन होवूशकले नाही . परंतु दुपारी ११.३० वा कोल्हापुरात पोहचून उप विभागीय अधिकारी करवीर श्री वैभव नावडकर  व तहसीलदार करवीर श्रीमती. शीतल मुळे यांचे समवेत तहसील कार्यालयातील कामकाजाची पाहणी / तपासणी केली . काय काय करावे लागेल ह्या बाबत चर्चा केली . उपस्थित तलाठी ,मंडळ अधिकारी , नायब तहसीलदार व तहसीलदार यांचे शंकासमाधान केले व पुढच्या प्रवासाला निघालो .

             दुपारी ४.०० वा तहसील कार्यालय आजरा   मध्ये पोहोचलो तेथे तहसीलदार श्री. विकास आहेर यांचे कडून ई फेरफार प्रकल्प व कलम १५५ अन्वये दुरुस्त्या या कामाची माहिती घेतली उपस्थित तलाठी ,मंडळ अधिकारी , नायब तहसीलदार व तहसीलदार यांचे शंकासमाधान केले व पुढच्या प्रवासाला निघालो .


              आंबोली जवळ असलेल्या आमचे सहकारी श्री कृष्णा पास्ते यांचे घरी त्याचे आई वडिलांची भेट घेतली . त्यांचा १५/२० मिनिटात पाहुणचार घेवून कुडाळ मुक्कामी रवाना झालो . रात्री ९.३० वा कुडाळ ला पोहोचलो .

दि ६.११.२०१९

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कार्यशाळेसाठी कोंकण विभागाचे उप आयुक्त महसूल मा सालीमठ साहेब हे देखील रात्रभर प्रवास करून पहाटे ५.३० वा कुडाळ ला पोहोचले होते.  त्याचे समवेत तसेच  रत्नागिरी चे अप्पर जिल्हाधिकारी व सध्याचे प्रभारी जिल्हाधिकारी  मा. मंगेश जोशी  साहेब यांचे समवेत नाश्ता चहा करून जिल्हाधिकारी यांचे समवेत सावंतवाडी मराठा संस्थानाच्या सभागृहात सकाळी ११.०० वाजता कार्यशाळा सुरु झाली .
दिवसभर सदरीकरन , चर्चा , शंकासमाधान करून संध्याकाळी ७.०० वा प्रशिक्षणवर्ग संपवून रत्नागिरीकडे जायला निघालो .

रात्री ९.३० वा डी सी आर श्री सालीमठ साहेब यांचे समवेत मार्गावरच राजापूर येथे राजापूर चे उप विभागीय अधिकारी मा. प्रवीण वराळे यांचे समवेत जेवण घेवून मुक्कामासाठी रत्नागिरी गाठले .


दि ७.११.२०१९
   सकाळी माझे वर्गमित्र व रत्नागिरी चे अप्पर जिल्हाधिकारी मा. बाबासाहेब बेलदार साहेब यांचे समवेत चहा नाष्टा घेवून रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मा. सुनील चव्हाण साहेब यांचे उपस्थितीत व मा सालीमठ साहेब , बेलदार साहेब , निवासी उप जिल्हाधिकारी  मा. दत्ता भाडकवाड साहेब यांचे समवेत सावरकर सभागृह रत्नागिरी येथे कार्यशाळा सकाळी ११,०० वाजता सुरु केली .

अनेक विषयावर सादरीकरणे , चर्चा शंकासमाधान करून कार्यशाळा रात्री ८.३० वा संपली . या वेळी जिल्हाधिकारी महोदय पूर्णवेळ उपस्थित होते हे महत्वाचे .

रात्रीचे जेवण घेवून रात्री ११.०० वाजता कोकण कन्या ही कोकण रेल्वेचे गाडी पकडून डी सी आर साहेब यांचे समवेत मुंबईकडे रवाना झालो .

दि ८.११.२०१९

पाहते ४.३० वाजता पनवेल रेल्वे स्टेशन ला तलाठी मित्र शशिकांत सानप तेथे हजरच होते .
थोडासा आराम करून कार्तिकी एकादशी असल्याने थोडसे फराळ घेवून तेथून जवळच खारघर येथे असलेल्या गरम विकास भवन मध्ये रायगड , ठाणे , मुंबई उपनगर व पालघर या चार  जिल्ह्यातील मास्टर ट्रेनर्स च्या कार्यशाळेला सकाळी ११.०० वाजता सुरुवात केली त्यावेळी डी डी ई रायगड मा.श्रीमती भाग्यश्री  बैनाडे म्याडम , डी डी ई ठाणे मा. अभिजित भांडे व मुंबई उपनगर चे डी डी ई मा, सर्जेराव सोनवणे उपस्थित होते . या प्रशिक्षण वर्गात वादळाच्या शक्यतेने पालघर कर उपस्थित नव्हते असे मला सांगण्यात आले . कार्यशाळा रात्री ७.०० वाजता संपून आम्ही ( श्री कृष्णा पास्ते व सचिन भैसाडे ) रात्री ११.०० वाजता पुन्हा पुण्यात घरी पोहोचलो .

अश्या या कोल्हापूर कोंकण दौर्यात अनेक गोष्टी समजल्या , अनेक अनुभव आले , अनेक माणसे भेटली . अनेक अडचणी समजून घेतल्या . अनेक नवीन गोष्टी सहकारी मित्रांना संगील्या त्या आता लिहित नाही
पुन्हा कधीतरी वेळ मिळाला तर लिहील


आपला

रामदास जगताप
दि ९.११.२०१९





Comments

Archive

Contact Form

Send