सहा तालुक्यात ई-पीक पाहणी मोबाइल अॅप चा प्रशिक्षण शुभारंभ संपन्न दि २.२.२०१९
नमस्कार मित्रांनो ,
आगोदर ठरल्याप्रमाणे आज दि २.२.२०१९ रोजी कृषी आयुक्त कार्यालय ,पुणे येथे
सदरचा शुभारंभ राज्याचे माजी मुख्य सचिव मा. जयंतकुमार बांठिया साहेब यांचे शुभ हस्ते , मा. एस . चोक्कलिंगम साहेब , जमाबंदी आयुक्त ,यांचे अध्यक्षतेखाली व मा. विकास रस्तोगी साहेब , कृषी आयुक्त मा. सचीन्द्रप्रताप सिंग साहेब , विभागीय आयुक्त पुणे मा.श्री. दीपक म्हैसेकर साहेब , टाटा ट्रस्ट चे प्रतिनिधी मा. एम अरुमुगम साहेब (से.नि. आय .ए.एस.), मा. नरेंद्र कवडे साहेब (से.नि.आय .ए.एस. ) , श्री . अशोक लोखंडे साहेब , श्रीमती हनी बजाज , NIC पुणे चे श्री संजय कोतकर , श्रीमती शुभांगी राव . यांचे प्रमुख उपस्थित संपन्न झाला. या वेळी या ६ जिल्हे व तालुक्यातील डी डी ई तथा उप जिल्हाधिकारी , महसूल व कृषी विभागाचे उप विभागीय अधिकारी , कृषी विकास अधिकारी , तालुका कृषी अधिकारी , तहसीलदार उपस्थित होते . या नंतर तालुकास्थरीय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्याच्या तारखा निश्चित करणेत आल्या .
नाशिक व औरंगाबाद - दि ४ फेब्रु.२०१९
अमरावती व पुणे - ५ फेब्रु.२०१९
नागपूर व पालघर - ६ फेब्रु.२०१९
या ई पीक पाहणी प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी झाल्यास राज्यातील शेती क्षेत्रात अमुलाग्र बदल झालेला दिसेल . कामात पारदर्शकता व अचूकता येईल , शासनाला आवश्यक असलेली अचूक माहिती पिकांच्या उत्पन्नाचा अंदाज , किमान आधारभूत किंमत ठरविणे , खातेदार निहाय याद्या तयार करणे या साठी होणार आहे .तलाठी यांचे वरील कामाचा तान काही अंशी कमी होण्यास मदत होईल असा मला विश्वास वाटतो .
आगोदर ठरल्याप्रमाणे आज दि २.२.२०१९ रोजी कृषी आयुक्त कार्यालय ,पुणे येथे
TATA TRUSTS ने जमाबंदी आयुक्त कार्यालयाचे व कृषी आयुक्त कार्यालयाचे सहकार्याने विकसित केलेल्या ई पीक पाहणी या मोबाइल अॅपचा शुभारंभ व कार्यशाळा आयोजित करणेत आली होती . या द्वारे सहा महसूल विभागातील वाडा ( पालघर ) , बारामती ( पुणे ) , दिंडोरी ( नाशिक) , फुलंब्री ( औरंगाबाद ) , अचलपूर ( अमरावती ) , कामठी ( नागपूर ) या सहा तालुक्यात मोबाइल द्वारे पीक पाहणीच्या नोंदी शेतकरी यांनी थेट तलाठ्याकडे पाठविण्याची सुविधा प्रायोगिक तत्वावर सुरु करणेत आली आहे .
नाशिक व औरंगाबाद - दि ४ फेब्रु.२०१९
अमरावती व पुणे - ५ फेब्रु.२०१९
नागपूर व पालघर - ६ फेब्रु.२०१९
या ई पीक पाहणी प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी झाल्यास राज्यातील शेती क्षेत्रात अमुलाग्र बदल झालेला दिसेल . कामात पारदर्शकता व अचूकता येईल , शासनाला आवश्यक असलेली अचूक माहिती पिकांच्या उत्पन्नाचा अंदाज , किमान आधारभूत किंमत ठरविणे , खातेदार निहाय याद्या तयार करणे या साठी होणार आहे .तलाठी यांचे वरील कामाचा तान काही अंशी कमी होण्यास मदत होईल असा मला विश्वास वाटतो .
Comments